उमजत होते तुला सर्व,
का नाही तेव्हांच रोखले ?
कळी माझी खुलण्या आधीच,
फ़ुल का नाही तोडले ?
स्वप्नात तुझ्या मी रमलो,
का नाही मला जागवले ?
प्रेम मजला होण्याआधीच,
का नाही तु थांबवले ?
सोडूनच जायचे होते तुला एकदा,
तर का मला झुरवले ?
माझी व्यथा तुला काय समजणार,
का कारण बनवुन भुलवले ?
दु:ख मी नाही करत,
मीही आता सावरलो आहे...
तुझ्या विना मी आता,
जगायचे कसे ते शिकलो आहे...
तु सोडुन गेली तरी,
मला दुसरीने जवळ केले...
न सोडुन जायचे मला,
तुझ्याच आठवणीने वचन दिले...
कोमेजलेल्या माझ्या फुलाला,
तिच टवटवीत ठेवणार आहे...
तो प्रत्येक सोनेरी क्षण मला,
ती पुन्हा दाखवणार आहे...