( ही कविता त्या हजारो शेतक-यांची कथा आहे
ज्यांनी देहाला संपवले तरी आत्म्याला शांती नाही.....)
आता मी सुटलो आता माझ्या संसारी नाही
आता मी सुटलो आता मी कर्ज बाजारी नाही
आता मी मुक्त आहे पण तरी झॊप नाही
माझ्या लेकरांना कोणी इथे बाप नाही
फाटलं आभाळ सार पण पाण्याचा थेंब नाही
कधी सांडलं तर इतकं सांडलं की थांबायचं नाव नाही
माझी धरणी माय माझ्या म्रूत्यूला कार झाली
कधी पाण्यासाठी कधी भरपाण्यांत बोलायची सोय नाही
सर्जा राजाही माझे उपाशी मग मी का भाकरी खावी
देणेकरांची वरात तलवारीसह रोज दारात माझ्या यावी
आता सरकारी येतात आणिक पंचनामा करुन जातात
आत्म्याच्या मोलाची जाण नाही त्यांनी देहाची किंमत करावी
ती ही रडते आहे पाहून माझ्या सुकलेल्या कणसाकडे
शाळा शिकायची होती आता जातो तो कोरड्या मळ्यांकडे
ती चिमुकली माझी रोज विहिरीत त्याच डोकावते
बाप गेला तिथून येईल म्हणून एकटक डोळे तिचे रहाटाकडे.
आज मेल्यानंतरही मी असा कर्जात माझ्या बुडलेला
मुक्तीसाठी हा जीव माझा त्या आभाळात उडालेला
सरकार म्हणते कारण दुसरंच होत माझ्या आत्महत्तेच
ही माझीच कहाणी नाही कितिकांवर नियतीने सूड हा उगवलेला.