विजयकुमारची चतुराई

फार फार दिवस झाले. किरणनगरीत विजयकुमार नामकं एक तरुण राहत होता. अतिशय शूर, वीर आणि चतूर होता तो. एकदा एका लढाईत तो जखमी झाला. परदेशी सेनेनं घायाळ कुमाराला पकडून नेलं व कैदेत ठेवलं. काही दिवसांनी विजयला बादशहासमोर दरबारात आणलं. तिथं शहाला लवून सलाम करणं जरूरी होतं पण अभिमानी कुमाराला ते का रुचतं ? तो गुपचिप उभा राहिला. हे बघुन शहाच्या डोळ्यातून आगीची बरसात होऊ लागली. अन तोच कुमाराला यावर तोड सुचली.

तो पुढं गेला. बोटातली अंगठी काढली व सिंहासनापुढं भूमिवर अलगद फेकली. नंतर ती उचलायला तो वाकला...... झालं ! बादशहाला वाटलं की यानं सलामच केला, मग तो खूष झाला. पुढे कुमाराची लवकरच सुटका झाली. सापही मेला व लाठीही तुटली नाही.