विवाह रुपाने बांधली जाईल
तुझी नि माझी जीवनगाठ
कारण आहे आपल्या दोघांची
एकच पाऊलवाट
---------------------------------
काहीजण किती
कठोर नियम पाळतात
प्रेम करणाऱ्यांना नेहमी
बदनामीच्या आगीत जाळतात
---------------------------------
काहीजण कळूनसुद्धा
नकळल्यासारखे वागतात
प्रेम करणाऱ्यांवरती ते
सदैव बंधने लादतात
---------------------------------
प्रेम करण्यासाठी हवी तयारी
संकटांना तोंड देण्याची
प्रेमाने मागून मिळत नसेल तर
जबरदस्तीने ओढून घेण्याची
----------------------------------
लोकांच अजब आहे
प्रेमाला ते नाव ठेवतात
लग्न जुळवताना मग ते
गाव का शोधतात?
---------------------------------
-: रवि विश्वासराव (कवी)
प्रेमस्पर्श या चारोळी संग्रहातून साभार.