प्रेमस्पर्श २

विवाह रुपाने बांधली जाईल

तुझी नि माझी जीवनगाठ

कारण आहे आपल्या दोघांची

एकच पाऊलवाट

---------------------------------

काहीजण किती

कठोर नियम पाळतात

प्रेम करणाऱ्यांना नेहमी

बदनामीच्या आगीत जाळतात

---------------------------------

काहीजण कळूनसुद्धा

नकळल्यासारखे वागतात

प्रेम करणाऱ्यांवरती ते

सदैव बंधने लादतात

---------------------------------

प्रेम करण्यासाठी हवी तयारी

संकटांना तोंड देण्याची

प्रेमाने मागून मिळत नसेल तर

जबरदस्तीने ओढून घेण्याची

----------------------------------

लोकांच अजब आहे

प्रेमाला ते नाव ठेवतात

लग्न जुळवताना मग ते

गाव का शोधतात?

---------------------------------

-: रवि विश्वासराव (कवी)

प्रेमस्पर्श या चारोळी संग्रहातून साभार.