मी नागपुरात लक्ष्मिनगर भागात राहते. उजव्या रस्त्यावर १/२ किमी. अतंरावर दिक्षाभूमी आहे, डाव्या रस्त्यावर दुर्गादेवी बसते. दसऱ्याच्या दुसऱ्यादिवशी आम्ही सकाळी फिरायला जात नाही पण तातडीच्या कामानी १० वाजता बाहेर जाणं आवश्यक होतं म्हणून बाहेर पडले तर सुखद धक्का बसला! रस्ते अगदी स्वच्छ होते व गर्दी पण कमी होती. चौकात भली मोठी कचराकुंडी व विभाजकावर मध्ये मध्ये ड्र्मच्या कचरकुंड्या ठेवलेल्या. हे असं कधी तरी घडावं अशी आशा/इच्छा होती. असेच तुमचे सुखद अनुभव वाचायला आवडतील.