मध्यप्रदेश सरकार तर्फे देण्यात येणारा "कालिदास" पुरस्कार शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणार आहे... त्यांनी सांगितलेले शिवचरित्र ऐकून, वाचून सूचलेल्या काही ओळी .
ग्रहण सूर्यास लागे
पापभारे धरती डोले
अंधःकार घनघोर
पसरे पारतंत्र्याचा ।रयत दीन बिचारी
त्राही त्राही होई
जुलमी फौजा शाही
लुटती दिशा दाही ।मंदिरात देव नाही
वावरात माणूस नाही
आक्रोशे काळी आई
वैभवास वारस नाही ।गोमाता भयभीत
गृहलक्ष्मी चिंताक्रांत
घरधनी जाई रणी
रक्षिण्या तीज न कुणी ।अधर्म असा भयंकर
माजला हाहाःकार
म्लेंछास निर्दाळण्यास
अवतरी तारणहार ।म्लेंछास त्या मारीन
स्वराज्यास स्थापीन
शपथ घेसी तु
रायरेश्वरा स्मरून ।ती नजर तुझी करारी
फिरे सह्याद्रीवरी
आतुर लावण्या भगवा
गडकोट किल्ल्यांवरी ।रणशिंग करी नाद
भगवा डोले गगनात
करी पराक्रमाची शर्थ
रणांगणी झुंझण्यात ।बादशाही थरारे
सिद्धी, गोरे नमले
जिंजीचेही राज्य जिंकीले
ध्वज स्वराज्याचा चाले ।छत्र धरे मस्तकी
वरदान भवानीचे हाती
स्वातंत्र्याचा गोंधळी
आईचा पोत नाचवी ।लेकी, सुना सुखावती
मातीतून पिकती मोती
सुखाची वर्षा करी
गगन मस्तकावरी ।धन्य होई जिजामाता
सुखावे सारी प्रजा
सह्यगिरी हर्षित
तु शिवकल्याण राजा
तु शिवकल्याण राजा ।