चिन्च, गुळ, लाल मिरच्या, धणे पावडर, गरम मसाला, तिखट,मीठ
नारळाचे दुध, कोथिम्बीर
१५ मिनिटे
३-४
सर्वप्रथम तूपात जिरे, मोहरी ,हिन्ग, हळद फ़ोडणी करा व त्यात ५-६ उकडलेले बटाटे घाला.
त्यात कोळलेली चिन्च, गुळ, मीठ,धणे पावडर,गरम मसाला आणि तिखट ( बेताने जसे हवे असेल तसे) घालावे.त्यात थोडे गरम पाणी घालून चांगली शिजवून घ्यावे. चिन्च बर्यापैकी घालावी म्हणजे थोडिशी आंबट गोड चव येते भाजीला.
गॅस बंद करून मगच त्यात नारळाचे दुध घालावे. चवीला मीठ राहिलेच की.
वरून कोथिम्बीर पेरावी. मस्त खमंग लागते भाजी.
शुद्धलेखन सुधारणेचे काम सध्या चालू असल्यामूळे चुकांबद्दल क्शमा असावी
नारळाचे दुध जास्त गरम होउ देऊ नये नाहीतर दुध फुटते.
मैत्रिण - व्रुशाली बोडस-राजवाडे
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.