४-५ हिरव्या मिरच्या, आलं, एक टिस्पून ओवा, ३-४ पाकळ्या लसूण, मीठ, तेल
३० मिनिटे
२-३ जणांसाठी
हिरव्या मिरच्या, आलं, ओवा, लसूण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे. त्यात दिड वाटी पाणी घालून नीट कालवून ते पाणी गाळून घ्यावे. त्या हिरव्या पाण्यात थोडे तेल आणि चवीनुसार मीठ, बाजरीचे पीठ घालून मळून पातळ भाकरी थापून भाजाव्यात.
हिरव्या मिरच्या, आलं, ओवा, लसूण यांचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करावे.
मैत्रीण
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.