घायाळ वादळही...

पुन्हा एकदा आलंच
(येणारच होतं ते).....
गेल्या वेळेस बरीच मोडतोड करून गेलेलं
यंदा पण झालंय बरंचसं नुकसान
कुंपणाच्या तारा गोळा झाल्यात
खांब उखडून पडलेत
(अजूनही बरीच नासधूस झालीये)
आता मात्र पक्का बंदोबस्त करावा लागेल अस दिसतंय
सिमेंटची पक्की भिंत बांधून घ्यावी
आणि हो वरती फुटक्या बाटल्यांच्या काचा पेरायला हव्यात
म्हणजे नुसतं डोकावायचं म्हणलं तरी घायाळ झालं पाहिजे हे वादळ.
....
(आतलेही होतील घायाळ त्यावरून बाहेर डोकावताना )
चिंता करायची नाहीच काही गरज ,
बंदोबस्त झालाय....
--------------------