एशियाड बसचा समावेश करून तब्बल १८ मोटारी कमी करून राष्ट्रपतींनी एक वेगळा पायंडा घालून दिला.
ही एक स्तुत्य बाब आहे.
मनोगतींनो, राष्ट्रपतींना अथवा त्यांच्या कार्यालयाला अचानक उपरती कशामुळे झाली असेल असे वाटते?
इंधन दरवाढ, वसुंधरेची काळजी, जाहिरात प्रसिद्धि, का आणखी काही?
उत्सुकता अशी आहे की, असा प्रकार किती दिवस चालू राहील? नाही तर 'तेरड्याचा रंग ३ दिवस' याप्रमाणे ५०-६० मोटारींचा ताफा पुन्हा रस्त्यांवरून जाताना दिसेल.