अर्धा चमचा शहाजिरे, चार तेजपत्ता, एक चमचा तिखट व चवीनुसार मीठ
एक वाटी तांदूळ
तीन चमचे तेल, तूप ( वाढताना )
३० मिनिटे
तीन माणसांकरीता.
भात मोकळा शिजवून ( कुकराला लावू नये ) घ्यावा. पालकाची पाने व कोवळ्या काड्या धुऊन गरम पाण्यात तिनचार मिनिटे बुडवून मिक्सरवर वाटून घ्यावे. कढईत तेल घालावे. तापले की त्यावर खडा मसाला ( लवंगा, मिरे, दालचिनी, शहाजिरे, मसाला वेलची व तेजपत्ता ) परतावा. त्यावर आले-लसूण, कांदा, टोमॅटो व मक्याचे दाणे घालून मध्यम आचेवर परतावे. अर्धे भांडे पाणी घालून झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी वाटलेला पालक, लाल तिखट, चवी नुसार मीठ व अर्धे भांडे पाणी घालून सगळे मिश्रण एकत्र करून लागलीच झाकण ठेवावे. सात/आठ मिनिटाने आच बंद करावी. वाढताना गरम भात त्यावर गरम भाजी व एक चमचा साजूक तूप घालून कालवून वाढावे.
साजूक तुपामुळे भाताची खुमारी अतिशय वाढते. खाणारा खूश होऊन जातो. पालक कुकराला लावू नये, लावल्यास सुंदर हिरवागार रंग येणार नाही.
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.