चिरलेला कोबी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. ( सगळे मिळून १ वाटी )
किसलेले गाजर, बीट आणि मोड आलेले मूग. ( सगळे मिळून १ वाटी )
मिरचीचे अगदी बारिक तुकडे / ठेचा, मीठ. ( चवीनुसार )
२० मिनिटे
४ जणांना एकदा जेवणाला पुरेल.
१) रवा ५-६ तास पाण्यात (सरसरीत) भिजवावा.
२) नंतर त्यात तांदूळाचे पीठ, मीठ, मिरचीचे अगदी बारिक तुकडे / ठेचा आणि बाकी सर्व साहीत्य घालवे.
३) निर्लेप तव्यावर तेल टाकून , नेहमी प्रमाणे उत्तपे घालवेत. (दोन्हीकडून भाजावेत.)
रंगीबेरंगी आणि पौष्टीक उत्तपे तयार !
( हे सॉस किंवा पंढरपूरी डाळं, मिरच्या, ओलं खोबंर, कोथिंबीरी च्या चटंणी बरोबर खावेत. )
नाही.
सौ. आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.