मुंबई हल्ला :- अनुत्तरित प्रश्न

मुंबईत २६/११/२००८ ला झालेल्या हल्ल्याच्यावेळी आणि त्यानंतर जे घडलं, त्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत नाहीय. या संदर्भात श्रीमती करकरे, साळस्कर आणि कामटे यांचे वक्तव्य आणि अनुभव , तसेच मुनिफ व श्रीमती कामटे यांचे पुस्तक वादाचा विषय झाले आहे.

हा हल्ला केवळ पाकिस्तानातील अतिरेकी यांच्यापर्यंतच मर्यादित न राहता, एक कट होता असही म्हटल्या जात आहे. या विषयावर अधिक चर्चा व्हावी ही अपेक्षा.

मला पडलेले प्रश्न

१. करकरे स्वतः रॉचे अधिकारी होते, मग त्यांना ह्या हल्ल्याची पूर्वकल्पना होती का ?

२. त्यांची बुलेटप्रुफ कार हल्ल्याच्या ४ दिवस पूर्वी काढून घेण्याचे कारण काय ?

३. त्यांचा मृत्यू मानेत गोळी लागून झाला का सदोष जॅकेटमुळे ? करकरेंचे जॅकेट गहाळ झाले की केले ?

४. साळस्कर, कामटे व करकरेंना एकाच गाडीतून जाण्याचे आणि एकाच जागी जाण्याचे कारण व आदेश कुणी दिले ?

५. या हल्ल्यामागे सीआयए वा मोसाद आहे का ?

६. त्यांना मदत स्थानिकांमधून मिळाली असण्याची शक्यता आहे काय ?

७. केंद्र आणि राज्यसरकार खरंच गंभीरपणे "कसाब"विरुद्ध खटला चालवत आहे काय ? ऍड. उज्ज्वल निकम यांचा प्रश्नच नाही मात्र पोलिसांचे काय ?

८. या क्षणी भारताची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था खरंच मजबूत आहे असे म्हणता येईल ?

९. विश्वास ठेवावा तरी कुणावर ? पोलिसांवर, राजकारण्यांवर, नोकरशहांवर, की देवावर ?

१०. काही पोलिस उदा. तेव्हाचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त के. एल. प्रसाद, अतिरिक्त आयुक्त के. वेंकटेशन, देवेन भारती आणि परमबीर सिंह  अधिकारी घटनास्थळी गेलेच नसल्याचे स्पष्ट झालंय. हे असं का व्हावं?

अधिक दुवे

दुवा क्र. १

दुवा क्र. २

दुवा क्र. ३

दुवा क्र. ४

मुश्रीफ यांच्या पुस्तकाबद्दल :

दुवा क्र. ५

विनिता कामटेंच्या पुस्तकाबद्दल आणि राकेश मारींयांबद्दल :

दुवा क्र. १