२ बटाटे उकडून, साली काढून चौकोनी मध्यम आकाराच्या तुकड्यांत चिरून
इतर भाज्या : मटार, फरसबी, फ्लॉवर इत्यादी वाफवून घेणे.
आले - लसूण पेस्ट अर्धा ते एक टीस्पून (आवडीनुसार)
गरम मसाला
दही/ क्रीम
चवीप्रमाणे मीठ, वरून पेरायला कोथिंबीर, तेल
३० मिनिटे
तीन ते चार माणसांसाठी
(चित्रावर टिचकी मारून चित्र मोठ्या आकारमानात पाहावे)
प्रथम तेलात कांद्याची पेस्ट व आले-लसूण पेस्ट व्यवस्थित परतावी. त्यात टोमॅटो प्यूरी व गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे. उकडलेल्या बटाट्याचे तुकडे वेगळे तांबूस सोनेरी परतून/ तळून घ्यावेत. ( अन्यथा तसेच वापरले तरीही चांगले लागतात. ) परतलेल्या मसाल्यात वाफवलेल्या इतर मिश्र भाज्या घालाव्यात, परतलेला बटाटा घालून मीठ, आवश्यकता वाटल्यास तिखट घालून पुन्हा जरा परतावे. थोडे पाणी घालावे व पुन्हा ढवळावे. सर्व पदार्थ व्यवस्थित शिजल्यावर वरून दही/ क्रीम घालावे व कोथिंबीर पेरून गरमागरम भाजी पोळी/ भाकरी/ ब्रेड/ रोटी/ फुलक्या बरोबर खायला द्यावी. भाताबरोबरही छान लागते.
ह्या भाजीत पनीर/ टोफ़ू तळूनही छान लागते. किंवा बटाटा/ दुधीचे कोफ्तेही सोडतात. तयार मुठिया मिळतात, त्याही छान लागतात. तसेच चव बदल म्हणून स्वीट कॉर्न, मश्रूम्स, सिमला मिरची ही वापरू शकता. ब्रोकोली, गाजर यांसारख्या भाज्याही वापरू शकतो.
आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.