प्रस्तावना: कविता कवींनीच लिहाव्यात असे बंधन नाही यामुळे हे धाडस.
काही कविताः
१.
आटपाट नगरीतले
कवी इतके सोकावले
लिहिण्याआधी दुसऱ्यांच्या
वह्यांमध्ये डोकावले.
२.
कवीसंमेलनांमध्ये
कवी झाले इतके क्रुद्ध!
दोन-तीन गटांमध्ये
सुरू झाले टोळीयुद्ध
....
सूचनांचा, ताशेऱ्यांचा
सुरू झाला भडिमार
एक गट ओरडलाः
"गनिमाचा गडी मार! "
३.
कवितांच्या राज्यामध्ये
दहशतवादी घुसलेत
संधी कधी मिळेल याची
वाट बघत बसलेत
...
कवितांच्या राज्यामध्ये
इतके झाले बंड
कोण कवी कळेना
आणि कोण गुंड!
४.
म्या-न कवी
मी 'म्यान' कवी
थोर बाकिचे
'मान्य' कवी
....
नावच टोपण
काही कवींचे
बंदच टोपण
मम लेखणीचे
..
बंद टोपण ही
म्यान समशेर
म्या-न कवी
मी 'म्यान' सपशेल
...
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.