माओवाद्यांनी केली ४ जवानांची हत्या ?? काय तालीबानी राजवट आली का तिथे ??

माओवाद्यांनी केली ४ जवानांची हत्या दुवा क्र. १ ! ~!
१ लाख ९० हजार पोलीस+सीआरपीएफ आयोध्येत ठेवले, पुण्यात ६० हजार, मुंबई, गुजराथ, युपी, दिल्ली मिळुन् ३ लाख पोलीस आणि होमगार्डसोबतच राखीव जवानांची पाळत आणि ड्युटी लावली होती आठवडाभर... !!
ह्यातल्या निम्म्या लोकांना ४ दिवस जर गडचिरोलीत पाठवले, तर कायमचा प्रश्न सुटणार नाही का ? काय मुर्खपणा आहे हा ? नक्शलवादी माओवादी ह्यांच्या बातम्या गेली १५ वर्ष मी वाचत आलोय, तेच ते... पोलीस मेले, जवान मेले... अरे आपले पोलीस आणि जवान काय फुकट आलेत का ?
मिलिटरी मधल्या ६ ग्रुप ला लीड रोल आणि बाकी पोलिस/होम गार्ड/ सि. आर. पि. एफ चे जवान पाठवा, बघा आठवड्यात ही सगळी नाटकं संपतील.
नुसत्या बातम्या देउन उपयोग नाही !! धर्मप्रधान होण्यापेक्षा आता ७० वर्षांनंतर तरी कर्मप्रधान होण्यास हरकत नसावी... !!