सर्वप्रथम पोहे, लाह्या पाण्याने ओल्या करून घ्याव्या. भिजवून ठेवू नये.
मिरची, कोथिंबीर बारीक चीरून घ्यावी.
आता १ पातेले घेऊन त्यात पोहे, लाह्या, काकडीचा कीस, खोबऱ्याचा कीस, द्राक्षे,कोथींबीर, लिंबाचं लोणचं, डाळींब दाणे, शेंगदाणे, भिजवलेली चण्याची डाळ, दही, मीठ, व साखर घाला. आणि १० मिनीट झाकून ठेवा.
नंतर सर्व मिश्रण एकत्र करा आणि सर्व्ह करा.
पोहे जाड, पातळ कुठलेही चालतील,२-३ प्रकार एकत्र पण चालतात . चव आणखी चांगली येते.
आवडत असल्यास मेतकूट ही घालू शकता.
विदर्भामध्ये हा पदार्थ गोकुळाष्टमीला करतात.
पारंपारिक
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.