सकाली किर्तनकार बुवा बोलला
सहा शास्त्रे, अठरा पुराणे, चौदा विद्या
आन चार वेद माहित असायला
पाहिजेत प्रत्येकाला
ह्या माहितीन आता क फरक परतो बाला
फुकाचा डोक्याला भुंगा लवला
सगली माहिती नाय ना कोना एकाला
त्यान कं हाय अवरा
चार वेद त तुला माहिती आहेत
ऋग्वेद बोलतो :प्रज्ञान ब्रह्म
यजुर्वेद सांगतो : अहं ब्रह्मास्मी
सामवेद : तत्त्वमसी
अथर्ववेद : अयमत्माब्रह्म
ह्यो तर माहित व्हता मला पन
अठरा पुराणे म्हाईत नायीत मला
पयली सहा अशी हायेत बाला
१) स्कंद २) पद्म ३) वरद ४)शिव ५)वराह ६)विष्णु
नंतर ७)गरुड ८)श्रीमदभागवत ९)ब्रह्मवैवर्त १०)कुर्म ११)अग्नी १२)भविष्य
१३) मत्स्य १४) ब्रह्मांड १५)लिंग १६)ब्रह्म १७)वामन १८) मार्कंडेय
विद्याबी चौदा असतात
निदान एकात तरी पारंगत व्हणे
ह्याला मानुस म्हनतात
१)ब्रह्म २)रसायन ३)स्वरधर ४)वेद ५)ज्योतिष ६)व्याकरण ७)धनुर्विद्या
८)जलतरण ९)न्याय १०)कोक ११)अश्वारोहण १२)नाट्य १३)कृषी १४) वैद्यक
आरे बाला, ६४ कलाबी अस्त्यात अजुन
आठवतांन का बघतो इच्यार करून
हां पन एक मातोर आता टाकतो बोलून
.... ह्या ज्ञानासाठी कल्लोळ होला
.... पोथ्या-पुराणांचा ज्ञान दाबून ठेवला
.... कॉंप्युटरच्या जगात समान संधी प्रत्येकाला
.... जाती पातीचा आरक्षनाचा वाद ह्यो कनाला
.... वेलीच जर सावध न्हाई होला
त ह्यो ज्ञान सगला चालला कायमचा परदेशाला
.... खरा हीरा लागतो कंच्याबी खानीन चमकायला.