शक्य असल्यास इतर पीठे ( ज्वारी , गहू , बाजरी, इ. ) मिळून २ चमचे
आले , लसुण , मिरची पेस्ट १ चमचा , हळद , मीठ ,
तीळ , लिंबाचा रस १ चमचा , खायचा सोडा चिमुटभर
१५ मिनिटे
७ ते ८
सर्व पीठे एकत्र करून त्यात रवा मिसळावा.त्यात चिरलेला पालक , हळद ,आले , लसुण , मिरची पेस्ट,
लिंबाचा रस १ चमचा , खायचा सोडा चिमुटभर , चवीनुसार मीठ घालून
रोल होइल असे मळावे , गरज असेल तर थोडे पाणी वापरावे.
रोल करून , तीळात घोळवावे. मायक्रोमध्ये किंवा कुकरमध्ये उकडून घ्यावेत.
थंड झाल्यावर वड्या कापून तळाव्यात.
भाजी खायला कंटाळा करणारी मुले, वड्या मात्र लगेच फस्त करतात.
( सर्व पीठामुळॅ पौष्टीक होतात. पालक मात्र पेस्ट न करता , बारीक चिरुनच घालावा.)
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.