१ किलो तांदूळ,आणि उडीद डाळ,मूग डाळ,व हरबरा डाळ (१ किलो )सम प्रमाणात साफ करून सर्व जिन्नस दळून आणावे
दळून आणलेले पीठ एका पातेल्यात घ्यावे
व त्यात लसूण बारीक करून टाकावे
हळद,तिखट,जिरे, मीठ,चवीनुसार टाकावे
गरजेनुसार पाणी टाका व
एकत्र पिठाचे मिश्रण गरम झालेल्या तव्यावर थोडे तेल लावून वाटीने पसरावे
व बाजूने थोडे तेल सोडावे मस्त खरपूस धिरडे तयार.
सोबत दाळव्याची चटणी किंवा शेंगदाणा चटणी द्यावी
माझी सहेली स्मिता जागदे
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.