येशील तू की ही मनाची भूल आहे...

येशील तू की ही मनाची भूल आहे

सळसळली दूर पाने वाटले तुझी चाहूल आहे.

तुझ्या तनूचा गंध घेऊन

येती तुझ्या गावचे वारे

मनात माझ्या आठवणींचे

फुलवीत प्रीत पिसारे

ज्या हृदयी तू राहसी ते प्रीतीचे राऊळ आहे.

तू नसताना मनात वसती

प्रीत भारले क्षण हळवे

हेच जीवाला वेड लागले

स्वप्नात तुझ्या गुंतावे

कळते मला स्वप्न क्षणांची ही मनाला हूल आहे.