शाब्दिक घाव कितिक ते बसले,
वज्राहूनी अति कठोर अंमळ..
गोड आठवणी संपल्याच जणू,
अंतरातल्या त्या म्रुदू न चंचळ ..
विषयांचे पेव फुटलेले,
आणून गेले मनांना भोवळ..
आठवल्या त्या तिक्ष्ण नजरा,
अन बोचरे उसासे निव्वळ !
घे जवळी चल उडूनी जाऊ
मनपवनाचा घेऊन वेग..
दरीखोर्याना मागे टाकून
मिटवून टाक ती वेडी भेग..
- पल्लवीसमीर