दोस्ती

।। दोस्ती ।।
एकदा दरार गेल्या दोस्तीला
पुन्हा सांधता येत नाही
दूर गेल्या माणसाला पुन्हा
जवळ आणता येत नाही
दोन टोकांना बांधता 
येईल ही पुन्हा
पण बांधलेली गाठ मग 
कोणापासून लपवता येत नाही
खरा दोस्त दूर होणे
फार मना लागून जाते
मग मनातले दुःख कोणास
सांगता येत नाही
सांग मला फार काय
मागते ही दोस्ती
थोडासा वेळ ही तूला
दोस्तास देता येत नाही
असे किती कमावणार आहेस
आणि कुठे नेणार आहेस
मरताना सोबतीला घेऊन
काही जाता येत नाही
चार दोस्त तरी सांभाळून
ठेवावे म्हणतो जिंदगी भर
मेल्या नंतर खांद्यांसाठी
वणवण करता येत नाही
-निलेश सामंत