मोबाईल

ते - 


आधी घरा-घरात एक घरटं,


अन मनामनांत चिमणा-चिमणी असायचे,


आज घरात कोणीच राहत नाही,


अगोदरचे लोक नातु-पणतु पाहायचे,


आजकाल सख्खा मुलगा,


सख्ख्या  माय-बापाला पाहत नाही.


आपण-


आई-बाबा खरतरं परिस्थीतीनंच,


मोबाईल झालोत आम्ही  लेकरं,


तुम्हाला उगाच वाटतं की,


मोबाईल मुळे उडुन गेलीत सारी पाखरं.