निशःब्द केलेस तु मला,
आता मी काय बोलणार तुला.
भेटलीस नाहीस तु मला जाताना,
तेंव्हाच कळाले देणार मला तु यातना.
जाताना जे काही माझे होते
ते सर्व तु घेऊन गेलीस.
न विसरता मात्र तु,
अश्रू डोळ्यांत सोडून गेलीस.
एक प्रश्न माझा मलाच
आता मी विचारत राहतो,
ती कोण आहे जिच्यासाठी,
कविता अजुनहि मी करत राहतो.
सुहास.