अष्टमीच्या मौक्तिकमंद चांदण्यात
समज आपण भेटलो
एखाद्या निवांत टेकडीवर
तर तू म्हणशील,
ही भेट पूर्वीच झाली असती तर
तुझ्या माझ्या आयुष्याचे नकाशे
किती बदलले असते!!
मी म्हणेन ,बदललेही असते
आणि तरीही याच टेकडीवर
अशाच चांदण्यात
तुला नाही,पण कोणाला तरी
मी भेटलो असतोच!!!!!
................कुसुमाग्रज (महावृक्ष)