तांदूळ धुऊन खळखळीत वाळवावे. एका पातेल्यात तूप घेऊन तापल्यावर त्यात लवंगा घालाव्या व तांदूळ घालावे. तांदूळ चांगले भाजून झाले की आधण पाणी ओतावे. भात थोडासा फडफडीत शिजवावा. कुकरला लावूनही चालेल.
एका पातेल्यात गूळ घेऊन गूळ पातळ झाला की त्यात खोवलेले खोबरे घालावे. खोबरे शिजले की त्यात भात मिसळावा. भाताची शिते मोडू नयेत म्हणून उलथन्याच्या मागच्या बाजूने भात परतावा.
आवडत असल्यास वरून काजू, बदाम यांचे काप, वेलेदोड्याची पूड घालावी.
घाईत लिहिले असल्याने चुका राहण्याची शक्यता आहे.
सौ आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.