सर्व प्रथम बटाटे उकडुन घ्यावेत. थंड झाल्यावर ते किसुन घ्यावे किंवा हाताने स्मॅश करुन घ्यावे.
गॅसवर कढईत तुप गरम करुन त्यात साखरेचा पाक करुन (घट्ट नको) वरिल साहित्य टाकुन ढवळावे.(वेलची पुड नंतर टाका) ते एकजीव होई पर्यंत चागले ढवळावे. लालसर रंग यायला लागला कि लगेच गॅस बंद करा.
मग ताटाला तुपाचा हात लावुन वरिल मिश्रण पसरावे. आणि वरुन थोडा सुक्या नारळाचा कीस पसरुन टाकावा.
थोडे थंड झाल्यावर वड्या पाडाव्यात
झाल्या मस्त वड्या तयार.....
(ह्या वड्या जास्त दिवस टिकतात कारण खोवऱ्याचे प्रमाण कमी आहे म्हणुन खवट होण्याची शक्यताही कमीच)
माझा सर्वात आवडता पदार्थ आणि तोही माझ्या आत्याच्या हाताचा.
करुन बघा आणि प्रतिसाद द्या.
माझी आत्या
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.