कणकेमधे मीठ आणि कडकडीत तेलाचे मोहन घालून मिसळून घ्यावे. आता पाणी घालावे (पोळीसाठी घेतो तेवढेच!). पण अजिबात मळू नये. अगदी हलक्या हाताने फक्त सारखे करुन घ्यावे. आता जाड बुडाच्या पातेल्यात साजूक तूप गरम करून सोडावे. आणि भिजवलेल्या कणकेचे अगदी ओबडधोबड चपटे गोळे थापून साधारण करंगळी एवढे जाड आणि वाटीच्या आकाराएवढे हे मुटकूळे पातेल्यात लावावे आणि वर झाकणात पाणी घालून मंद आचेवर ठेवावे. चांगले खरपूस भाजावेत. उलटून दुसऱ्याबाजूने पण थोडे भाजावेत. गरज पडल्य़ास पुन्हा थोडे साजूक तूप सोडावे.
गरम गरम दूधाबरॊबर कुस्करून किंवा नुसते तूपाबरोबर खायला मस्त लागते.
कणिक जर मळली तर खुसखुशीत न होता जरा कच्चे लागतात. म्हणून पाणी घालून कणिक अगदी नावाला फक्त मिसळून घ्यावी. (खरंतर कणिक मळायचा कंटाळा असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना हे बरेच आहे. :) ) कधी पोळ्या लाटायचा कंटाळा आला तर अगदी उत्तम आणि चविष्ट पर्याय आहे.
सौ. आई
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.