आमच्याकडे गेल्या काही वर्षांपासून दर महिन्या दोन महिन्यांनी काही लोक येऊन दरवाज्यावर तसेच बाजूच्या भिंतींवर खडूने काही आकडे व अक्षरे लिहून ठेवतात. हे पाहून अलिबाबा व चाळीस चोरांची आठवण आली. परंतु यामुळे घराबाहेरील दरवाजे व भिती यांची फ़ुकट खराबी होते. खडूचे भिंतीच्या रंगावर, लाकडी दरवाजाच्या पॉलीशवर पडलेले डाग पूर्णपणे जातच नाहीत. अशी खराबी करू नये अशी विनवणी केली असता सरकारी काम आहे, आम्हाला तसे हुकूम आहेत, अशी उत्तरे मिळतात. सदर मंडळी कोणतीही खानेसुमारी करीत नाहीत. ही खडूखराबी सदर मंडळी काही समाजकार्य म्हणून करीत नसणार. त्यांच्यावर काहीतरी खर्च होत असणार हे तर नक्कीच. तरी दर महिन्या दोन महिन्यांनी अशी दरवाजे व भितींची खराबी करण्याने कोणता सरकारी कार्यभाग पूर्ण होतो व त्यासाठी जनतेचा किती पैसा खर्च होतो याचा संबंधित अधिकारी खुलासा करतील काय?
शेखर पाठारे, दादर, मुंबई.
shekhar.pathare@gmail.com