आयुष्याच्या निबंधात...

आयुष्याच्या निबंधात-

सुखसमाधानाचे पुर्णविराम फार कमी असतात,

निरुत्तर संतापाचे प्रश्नचिन्हच जास्त जमतात.

कधी हास्याच्या श्रावणसरी बरसतात,

तर कधी अश्रुंचे महापुर लोटतात.

कुणाचे काही हरवते, कुणाला काही गवसते,

कुणाचे कुठे तुटते, कुणाचे कुठे जुळते.

कुणाला मिळते पोर्णिमेची शीतल छाया,

कुणाला मिळतो अमावस्येचा दाट काळोख.

कधी असतो गोंगाट, कधी स्मशान शांतता,

प्रत्येकाच्या आयुष्याची निराळीच वार्ता.

तरीही प्रत्येकाला हा निबंध लिहावाच लागतो-

कारण "देवबाप्पाच्या" शाळेत जाब द्यावा लागतो.