निरोप

काळाच्या या नाजुक गाठी

दातांनीही सुटतिल ना

हळूच उमलती पंख हे कोमल

दो हातांनि मिटतिल ना ॥

काळ बसला मारित गाठी

मिटुनि डोळे लावुनि मन

वैशाख वणवा अलगद पेटे

कातरस्मृतींचे जळते वन ॥

कालाचे हे चाक दातेरी

ना कधीही मागे फिरे

कोण चिरडते पदी तयाच्या

कोण उरे आणि कोण मरे ॥

प्रसन्नतेचा झरा खळाळे

ओसंडुनि हे गात्र न् गात्र

निरोप देतो तुजला आता

भरूनि गेले घटिका पात्र ॥