बघा जरा चौकट मोडुन....

              हल्ली आपला जीवनाकडे  बघण्याचा द्रुष्टीकोण किती बदलला आहे नाही का? किती रुष्ट झालो आहोत असं नाही का वाटत कुणालाच? बरयाच जणांना वाटते की आपण राजे झालो आहोत, पण सगळे कसे चौकट च्या राज्यासारखे वागतात असंच सारखं वाटत राहतं.अगदी काल परवाच घडलेला एक गमतीदार पण विचार करायला लावणारा (मला नाही, वाचकांना) किस्सा..

                    माझे काही मित्र त्यांच्या मित्राच्या विवाहात उपस्थित राहण्यासाठी (नव्हे वीकएंड आऊटिंगसाठी) बस ने जाणार होते.आता ते जाणाऱ म्हणजे मी त्यांना सोडायला जाणं आलंच.इंग्रजीत यालाच सी ऑफ की काय म्हणतात. (मुळ मुद्दा खडकी ला जातोय.) असो..  तर आम्ही सगळे बस थांब्यावर बसची वाट बघत,वेळ घालवत बसलो होतो. वीकएंड असल्यामुळे मुळगावाकडे(अहो नेटिव्ह) जाणारी, लग्न सराई असल्यामुळे लग्ननाला जाणारी,रातराणी ने जाणारी अशी भरपुर मेल्स, फिमेल्स (हल्ली आयटी वाल्यांना स्त्री पुरुष म्हटलं तर मळंमळायला होतं) वेळ साधारण रात्रीचे ११. हल्ली ११ म्हणजे रात्र म्हणने जरा धाडस होऊन मला राष्ट्रपती शौर्यपदकाची शिफारस तर नक्कीच मिळेल, आणि त्याहून शुक्रवार किंवा शनीवार असला तर सांगायची गरजच नाही.तर आमच्यातले काही बसथाब्याच्या(खाजगी बसवहातुक)  बाकावर,काही खुर्चीत आणि आमच्यातलंच एक पामर ताटकळत ऊभं होतं, असा सगळा सीन (सीन निट लक्षात असू द्या) असतांना साधारण आमच्याच वयाचा एक तरुण आला. (येथे वाचकांचा गैरसमज झाला असता की लिहणारा म्हणजे मी वयस्क तर नाही ना! असा अंदाज बांधू शकतात म्हणून आमच्याच वयाचा तरुण).

                    तो बिचारापण आमच्यासारखा संगणकाच्या कळींशी खेळून दमला असणार हे त्याचा चेहरा आणि त्याची पाठीवरची बॅग सांगत होती.(आता प्रतिसादामध्ये मला कुणीतरी विचारणार बॅगवरून कसे? समजा बॅग अगदी बरोबर पाठीवर असेल तर त्या ई तरुणाला काम नाही, जर बॅग अगदी बरोबर पाठ आणि कंबरेच्या मध्ये असेल तर निम्मा वेळ ई-मेल्स आणि निम्मा वेळ कामात जातो, आणि शेवटचा ग्रुप म्हणजे ज्यांची बॅग अगदी बरोबर मागच्या खिश्याच्याही खाली असेन तर समजावं काम भरपुर) आता अतीश्रमामुळे सहाजिकच त्याला बसायचे होते(बुड टेकवायचे ! म्हणा हवंतर) तो बसायला जागा शोधता शोधता आमच्या पर्यत आला. मी बाकावर बसलो होतो, माझ्या डाव्या बाजुला(हल्ली डावे फार आक्रमक झाले आहेत) माझा मित्र आणि उजव्या बाजूला बसायला थोडी जागा होती, पण पुढे झाड असल्यामुळे जरा अंधार होता. मित्रहो इथून जरा गंमत आहे.तो मला म्हणाला जरा जागा देणार का बसायला.आता मी जर डाव्याबाजुला सरकलो असतो तर मी आडोश्याला अंधारात माझी इच्छा नसतांना झाकलो गेलो असतो.(ग्रहण बिहण काहीतरी असतं असं वाचलय साळत अगदी तसं). मी म्हणालो "कारं बाबा..? तु बस की तिकडं" त्याने त्याचे डोळयांची बाहुल्या आणि चेहरा यात नव्वद अंशाचा कोन करून बघितलं. अन काय सांगता घाबुरलू ना मी..(हे मी चक्क शुद्ध मराठीत बोललु) पन त्याला मी म्हन्लं "बाबा माझ्या वरचा फोकस जाईन की रं! (इथे फक्त फ़िमेल्सचा) इथं एवढया फिमेल्स आणि मला यंदा कर्तव्य बी हाय.." हा माझा युक्तिवाद त्याला कळला/समजला तसा त्याचा चेहरा आईशप्पथ काय खुल्ला सांगु.. सगळा शिक्वेन्स लक्षात ठेवा बरंका! पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.(ओम शांती ओम)

            जागा तीच, सगळा सेट तोच पण एक सोडलं तर  पात्र तीच आणि माझ्या मित्रांच्या द्रुष्टिने जरा विचित्र पात्र म्हणजे.. मीच की. तर ते नवीन पात्र म्हणाल तर साधारण काका प्लस वय, आमच्या समोर खुर्चीत बसलेले(कोल्हपुर, सांगली चे असावेत , त्यांची मिशी सांगत होती) .त्याना जरा चलत दुरध्वनी(मोबाईल) वरती कॉल आला असेन. तर त्यांनी आपली खुर्ची सोडली.(जशी काही दिवसांत मनमोहन सिंग यांना सोडावी लागणार तशी).तेवढ्यात मी आमच्यातल्या ताटकळत ऊभं असलेल्या पामराला काकांच्या खुर्चीत बसवलं.(पामराची इतकी ताकतचं नाही की तो स्वतः काकांच्या खुर्चीत बसेल).आमचं पामर भित भितच बसलेलं. आणि काय सांगु तुम्हाला ते मिशीवाले काका आले ना.. बोंबला!  ते आले आणि म्हणतात कसे " ही माझी जागा आहे! मी बसलो होतो ह्या खुर्चीत ". आता.. झाली का पंचाइत पामराची. मी आपला तयार नेहमी सारखा, पोजिशन घेतली. अन म्हणालो "रुमाल बिमाल टाकलेला आम्हाला नाही दिसला! अन तुम्ही म्हणताय तुमची जागा" (हे रुमाल प्रकरण समजायला बस, एसटी ने प्रवास करावा लागतो) त्यांना उमगलं ह्या कार्ट्यानं आपली विकेट घेतली.तुम्हाला सांगू इतके गोड हसले ना ते.(रात्र नसती तर गालावरची खळी पण दिसली असती) तितक्यात म्हणजे काका नसतांना आमचं पामर पुटपुटलं "अरे काय खेचतो आहेस उगाच सगळ्यांची!"  तुम्हीच सांगा हे खेचणं आहे का? की थोडी गंमत.

          आपण दिवसातून किती तरी लोकांना भेटत/बघत असु. कधी बोलला आहात का त्यांच्याशी, कधी जाणलंय बस मधल्या तुमच्या सह-प्रवाश्याला? कधी आणलंय हसू तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या चेहरया वर? नाही ना? प्रयत्न करा हो जरा! जमेन आपल्या सगळयांना,बघा कशी दाद मिळते ते. वरील दोन व्यक्ती, दोन विचार, दोन पिढ्या, पण दोघे सुद्धा जीवनाच्या रहाट गाड्यात गुर्फटून गेले आहेत असं नाही का वाटत?. देऊ शकाल दोन क्षण चौकटी बाहेरचे? बघा जमलं तर सोडा आपली चौकटच्या राज्याची चौकट..