चुकलंच.... पण कुणाचं ??

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,


 मी तिला असं दुःखवायला नको होतं...


 


हां, झालं असेल काही उलटं सुलटं,


कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!


मी कधी याचा विचारच का केला नाही?


आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??


 


पण तरीही ती माझीच होती,


कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!


झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,


पण कुणी?, मी नाही म्हटलं... तिनं तरी??


 


तिला काय वाटत असेल आत्ता?


जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का...?


शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक ...पण,


मी काय करू? काय नको ? ...असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?


 


मी काहीच बोललो नाही.


बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..


बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,


पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!


 


शेवटचा निर्णय तिचाच होता ,


त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,


दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..


 मी तिला असं दुःखवायला नको होतं...


 मी तिला असं दुःखवायला नको होतं........!!!!


 


की...?  तिनं तरी मला असं दुःखवायला नको होतं...


 


......विभास