गुलाम

नको होतं मला ते , भावनांचा गुलाम होणं
म्हणुनच मी हद्दपार केलंय , सार्‍याच भावनांना
आता कसं हलकं वाटतय .......
आताही दिसतं मला सौंदर्य अन दुःखही
पण जाणवत नाही काहीच
आतपर्यंत काहीच पोहोचत नाही ....
शब्दातुन मग उमटायचा प्रश्नच येत नाही
तरीच हल्ली मी कविताही लिहीत नाही
ओह !!! माझी कविताही त्यांचीच गुलाम होती तर ....