मैत्रि

मैत्री म्हणजे मायेची साठवण,


मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण


हा धागा नीट जपायचा असतो,


तो कधी विसरायचा नसतो


कारण ही नाती तुटत नाहीत,


ती आपोआप मिटून जातात


जशी बोटांवर रंग ठेवून


फुलपाखरे हातून सुटून जातात