माणूस बेसिक प्रश्न सोडवू शकत नाही! काय असेल कारण याचं? तर त्याला प्रसंगाकडे निर्वैयक्तिकपणे पाहता येत नाही, तो पूर्वग्रहानी निर्णय घेतो, मग कायदे करतो आणि त्यातून पुन्हा नवीन प्रश्न निर्माण करतो!

आरक्षणाचा कायदा पाहा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला संधी मिळत नाही कारण मानवी जीवनाची दिशाच आर्थिक आहे, प्रत्येक गोष्ट आर्थिक निकषावर अवलंबून आहे. संधी नाही म्हणून आर्थिक विकास होत नाही आणि आर्थिक दुर्बलता आहे म्हणून संधी नाही असा पेच होता. आरक्षणाचा बेस आर्थिक परिस्थिती हवा होता पण तो जातीनिहाय झाला त्यातून सकृद्दर्शनी न्याय मिळाला असा फक्त दिलासा वाटला पण आता पुन्हा जातीय कलह निर्माण झाला आणि पुन्हा संधीच असमान वाटप आणि अन्यायाचा बदला असं वातावरण निर्माण झालं!

स्त्री-पुरूष कलहाचं स्वरूप देखील तसच आहे, तो प्रश्न सोडवण्यासाठी अन्याय हा बेस हवा होता पण कायदे पूर्वग्रह ठेवून केले गेले आणि त्यातून स्त्री-पुरूष समन्वय साधायच्या ऐवजी कधीही न संपणारा कलह निर्माण झाला. आता हा पेच जो पर्यंत माणूस इहलोकावर आहे तो पर्यंत तरी संपण्याची शक्यता नाही! काय असेल या प्रश्नाच उत्तर? तर आपल्या संसारात समन्वय! कारण स्त्री-पुरूष सुसंवाद कायदा कसा निर्माण करेल? तो प्रत्येकाला आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कौशल्यानी साधायला हवा.

आज परिस्थिती अशी आहे की पूर्वी स्त्री-पुरूष सामंजस्य आभावानी दिसत असेल तर आता ते त्याही पेक्षा कमी दिसेल (खरं तर दिसतंय) कारण पूर्वी त्या सामंजस्याला दोनच घटक होतो: पती आणि पत्नी; आता कायदा, वकील, न्यायाधीश आणि दोन्हीकडची कुटुंब असे अनेक घटक येऊन परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणा बाहेर गेलीये.


माझ्या इथे प्रकाशित झालेल्या लेखांचा काही उपयोग झाला तर मला आनंद होईल! विवाह, दुवा क्र. १ ,  स्त्री आणि पुरूष दुवा क्र. २, विवाहेतर सहजीवन दुवा क्र. ३!

संजय