रोऊ कुठे ही जिव्हाळपाती
कुठे दिसेना ओली माती
इथवर कातळ तिथवर माळ
मायेचा तर तिन्ही त्रिकाळ
कसा सरावा हा दुष्काळ......?
तनामनाचे लिंपण सुकले
काळजातले मी-पण नुरले
सर्वस्वाच्या खतपाण्याने
अंकुरले ना तृणपातेही.....
असा कसा हा युगांत आला
मातृगर्भ का कुस विसरला
पान्हयाच्या प्राशुनी सुरे ला
अलिपरी का दंश भरे हा.....?
दिनवाणी ही धरा दुभंगे
पातकास काळजात कोंडे
घुसमटुनी लाव्हाही झणी त्या
नचिकेताच्या स्वप्नी उसळे.........!
शीला.