म्हाराजा हरपला...

मराठी रंगभूमीवरील महनीय निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री. मच्छींद्र कांबळी यांचे आकस्मिक निधन झाल्याची बातमी आताच प्रसारीत झाली. मराठी रंगभूमीवर खळबळ माजवणारे "वस्त्रहऱण" हे गंगाराम गव्हाणकर लिखित नाटक भद्रकाली प्रॉडक्शन्स या त्यांच्या संस्थेने रंगमंचावर आणण्याचे धाडस केले. अनेक नाटके आणि मराठी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका लोकमान्य ठरल्या होत्या. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.  चिंचवड येथे फेब्रुवारी १९९९ मध्ये झालेल्या ७९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाला रसिक मुकले आहेत. 
त्यांना विनम्र आदरांजली...