हे विडंबन नाही. पुलस्ति यांच्या जटायू या गझलेची जमीन वापरून (परवानगी न घेता! पुलस्तिजी, क्षमस्व.) वेगळ्या विषयावर केलेली रचना आहे.
का 'अटल'चे नाव घ्यावे वाटते ?
'मुखवट्या'मागे लपावे वाटते ?
एकदा "जिन्ना निधर्मी" बोललो
आजही त्यावर रडावे वाटते!
पाजतो कॉफी सिन्योराला अता
क्वॉटरोचीला भुलावे लागते
रोग गुढगीचा, तरी आहे उभा
हो, घरी 'त्या'ने बसावे वाटते!
प्रश्न माझा नागपुरला एवढा
का जटायू मज करावे वाटते?
काय माझा दोष? कसली ही सजा?
...हाच की पी.एम. बनावे वाटते?
तोच मी अन त्याच त्या रथयात्रा
का मला पुस्तक लिहावे वाटते?
मी बनावा, 'तो' न व्हावा वाटते
यात का आयुष्य जावे वाटते?
जाणतो मतदान नाही दूर पण
ते अचानक आज व्हावे वाटते...