बाजीराव विश्वनाथ हा दुसरा पेशवा! महापराक्रमी! सारी दक्षिण आणि उत्तर त्यांनी आपल्या पराक्रमाने दणाणून सोडली होती. पण त्या काळच्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्याने ब्राह्मण्य सोडले म्हणून फार छळले! त्याला अनुलक्षून-
"संध्या स्नाना सदा विसरला,
ब्राह्मणात हा उगा जन्मला"
ऐसे कोणी खुशाल बोला!
चिंता त्याची नाही मजला!!
स्नान जाहले रिपु-रक्ताने,
पुन्हा कशाला हवे निराळे?
अरि-मुंडांचे घडता मर्दन,
कोण पुसतसे संध्या-पुजन?
देवमंदिरी मी नच गेलो,
किर्तनात वा कधी रंगलो,
रणक्षेत्रातच माझे नर्तन
इश-जपाचे ते आवर्तन!
रणात होता पुर्वज तर्पण,
तीर्थांची ना मला आठवण!
शस्स्त्रासंगे नित्य अर्चना!
कोण श्रवतसे व्यर्थ प्रवचना!
भटातला मी, भटावेगळा,
विचित्र-प्राणी तुम्हा वाटला!
गर्व बाळगा हिंदुत्वाचा,
फुका कशाला ब्राह्मण्याचा?
-----------------------
रिपू - शत्रू
अरी - शत्रू
आवर्तन - वारंवार
पुर्वज-तर्पण- पुर्वजांचे श्राद्ध
'भटातला मी'.. पेशव्यांचे मूळ आडनाव 'भट' होते. भट या शब्दाचा एक अर्थ ब्राह्मण असा आहे, तर दुसरा अर्थ रण गाजविणारा वीर योद्धा असा ही आहे.