जगा समजण्या आयुष्य सरले,
मज समजणारे मिळाले न कोणी.
लोक कित्येक भेटले परी,
माणुस मिळाला ना कोणी.
चहुकडे मुखवट्यांचा बाजार भरला,
ईथे खऱ्यास किंमत देई न कोणी.
सारा भावनांचा खेळ मांडला,
स्वप्नीच्या प्राजक्तास विचारे न कोणी.
दुःखाची आज मैफिल भरली,
सुखाचा मारवा आळवावा कोणी.
तरी वाटते शल्य हे न सरावे कधी,
आयुष्याअंती सोबती असावे कुणीतरी.