खास माणसं

जि माणसं आपल्या खांद्यावर हात टाकतात;

अन आपल्या बेसावध क्षणी आपल्याला;

स्वतःचा खांदाच देऊन टाकतात;

अशी ही माणसं जरा खासच असतात.

अशी माणसं आयुष्यभर आपल्याला;

काही न काही देतच राहतात;

स्वतःची ओंजळ रिकामी झाली तरी;

जन्मभर पुरेल इतकं प्रेम मात्र देतात.

वेदना कुठे आपल्याला झाली तर;

अश्रू त्यांच्या डोळ्यात येतात;

चुकलोच आयुष्याच्या वळणावर कधी;

तर आरशाप्रमाणे प्रामाणिक राहतात.

आयुष्यात कधी आलाच दाटून अंधार;

तर खास माणसांच्या पाऊलखुणा शोधायच्या;

आपण फक्त त्यावर आपली पावलं ठेवायची;

वाटा आपोआप सापडायच्या.

अशा या खास माणसासाठीचं फक्त;

आयुष्य पुन्हा जगावंस वाटत;

त्यांनी दिलेलं भरभरून प्रेम;

मनाच्या कप्प्यात जपावंस वाटत.