जि माणसं आपल्या खांद्यावर हात टाकतात;
अन आपल्या बेसावध क्षणी आपल्याला;
स्वतःचा खांदाच देऊन टाकतात;
अशी ही माणसं जरा खासच असतात.
अशी माणसं आयुष्यभर आपल्याला;
काही न काही देतच राहतात;
स्वतःची ओंजळ रिकामी झाली तरी;
जन्मभर पुरेल इतकं प्रेम मात्र देतात.
वेदना कुठे आपल्याला झाली तर;
अश्रू त्यांच्या डोळ्यात येतात;
चुकलोच आयुष्याच्या वळणावर कधी;
तर आरशाप्रमाणे प्रामाणिक राहतात.
आयुष्यात कधी आलाच दाटून अंधार;
तर खास माणसांच्या पाऊलखुणा शोधायच्या;
आपण फक्त त्यावर आपली पावलं ठेवायची;
वाटा आपोआप सापडायच्या.
अशा या खास माणसासाठीचं फक्त;
आयुष्य पुन्हा जगावंस वाटत;
त्यांनी दिलेलं भरभरून प्रेम;
मनाच्या कप्प्यात जपावंस वाटत.