घायाळ

जगण्याची ओझी मी स्वतः उचलायची;

पण मी कसे जगायचे हे परकेच ठरवायचे.

पाहिली मी राख होता स्वतःच्याच स्वप्नांची;

वाट त्याची पाहिली जे कधी नव्हतेच माझे .

लोक भेटायचे मला रोज हे अनोळखी;

रोज नवा भावनांचा बाजार ते मांडायचे;

खेळताना शब्दखेळी आपल्या मनासारखी;

मी नव्याने हसावे अशी अपेक्षा ते करायचे.

काय होती माझ्याकडून अपेक्षा या माणसांचि;

विचारून प्रश्न मनी मी कोलमडून जायचे;

घाव वर्मी पडायचे माझ्याच काळजावरि;

पाश मी माझेच सारे तेव्हा त्यावरी पांघरायचे.

खेद वाटतो आम्हा दुःख तुला दिले आम्ही;

लोक तेच असायचे पण शब्द असे बदलायचे;

सहज विसरुन जातिल ते वागलो आपण जे;

माझे गेलेले दिवस ते परतून कधी न यायचे.

आठवता भुतकाळ्यातल्या सुखद त्या आठवनि;

व्हायचे अलगद दुर सावट दाटलेल्या निशेचे;

जगून पाहव वाटायच पुन्हा करून सुरुवात नवि;

घायाळ मन माझे बिचारे कुठेतरी दचकायचे;