निवडणूकीच्या तारखा जेव्हां जाहीर होतील
तेव्हा .................
नेत्यांच्या गाठीभेटी , पक्षांची मोर्चा बांधणी
दिव्यांच्या गाड्यांचे ताफे , रस्त्यांरस्त्यांवरून धावतात
मोटार कसी असते माहीत नसलेल्या गावात.
तिकीट वाटप करताना , राखीव जागा आप्तांसाठी
काही थोड्या देऊ , जे लढतात जनतेसाठी.
पुन्हा वाहतील नवे वारे , नव्या दिशांनी
जुनेच चेहरे , पण नव्या जोमाने
घेऊन येतील .............
नवी आश्वासने , नव्या मागण्या , नवे लेबल पार्टीचे.
तितकीच ठोकतील नव्या जोमाने , गरिबी हटावाची भाषणे
निदान...............
बेकारांना काम देण्याची आश्वासने
पुन्हा येतील पाच वर्षांनी , त्याच त्या नव्या घोषणा
नवे विचार नव्या उमेदीनं , सर्व काही नवे नवे...........
----- साहेबराव खानसोळे.