कितीदातरी नाईलाजाने द्यावा लागतो;
हात आयुष्याच्या हातात;
डबडबलेल्या डोळ्यांनी;
मग कुठेतरी होतो घणाणता आघात;
सगळंच हरवून जातं;
पण हे सगळं अगदी निमुटपणे; ओठ बंद करून सहन करावंच लागतं.
किती साधी असतात कारणं;
आयुष्य भंगत जाण्याची;
रोजचंच आहे हे म्हणून;
रडताही येत नाही मनसोक्त;
पण आतल्या आत आपण कुठेतरी;
व्याकुळ झालेलेच असतो.
आयुष्यात हवी असणारी माणसं;
कापरासारखी उडून जातात;
पण त्यांचे संदर्भ सांगणाऱ्या;
रिकाम्या जागा भरतच नाहीत कधी;
रोजचे नवे चेहरे भेटले तरी;
पावलं स्थिर नसतातच.
आणी आपलं आतल्या आत मरत जाणं;
थांबत नाही कधीही.