तु उरला शुन्य

जगण्याची पायवाट चालताना;

तुझ्या पाऊलखुणा अचानक उमटल्या;

माझ्या मनातल्या भावना;

आनंदाने बहरून आल्या.

उगाचच वेड्यासारखी, बावळटपणे;

मी खुलले , फुलले होते;

स्वतःच हातच न राखता;

मी तुला सगळं देऊन बसले.

खरंतर तेव्हा आनंदच होता कारण;

माझ्या सर्वस्वाचा तुझ्यासाठी त्याग केला;

कुठल्या एका अनामीक ओढीने;

मी जनरितिलाच फास लावला.

अचानक सगळंच बदलून गेलं;

मनातलं लोकात कुजबुजलं गेलं;

आला अचानक हा वादळी वारा;

अन् लोकांचा बघण्याचा अंदाजच बदलला.

तू ही अगदी बदलूनच गेलास;

माझ्या पायवाटेला समांतर पायवाट करून;

तुझं फसवणं खरं ठरलं;

तर माझं प्रेम खोट ठरलं.

आजही मी माणसात राहते;

माझीमलाच मी पोरकी वाटते;

मनात अजुनही प्रेम निरतिशय;

पण हातात आता तु उरला शुन्य.