जगण्याची पायवाट चालताना;
तुझ्या पाऊलखुणा अचानक उमटल्या;
माझ्या मनातल्या भावना;
आनंदाने बहरून आल्या.
उगाचच वेड्यासारखी, बावळटपणे;
मी खुलले , फुलले होते;
स्वतःच हातच न राखता;
मी तुला सगळं देऊन बसले.
खरंतर तेव्हा आनंदच होता कारण;
माझ्या सर्वस्वाचा तुझ्यासाठी त्याग केला;
कुठल्या एका अनामीक ओढीने;
मी जनरितिलाच फास लावला.
अचानक सगळंच बदलून गेलं;
मनातलं लोकात कुजबुजलं गेलं;
आला अचानक हा वादळी वारा;
अन् लोकांचा बघण्याचा अंदाजच बदलला.
तू ही अगदी बदलूनच गेलास;
माझ्या पायवाटेला समांतर पायवाट करून;
तुझं फसवणं खरं ठरलं;
तर माझं प्रेम खोट ठरलं.
आजही मी माणसात राहते;
माझीमलाच मी पोरकी वाटते;
मनात अजुनही प्रेम निरतिशय;
पण हातात आता तु उरला शुन्य.