जाताना;चोहींकडे दाटलेल्या अंधाराच्या ;
तळागाळातून जेव्हा मी वर आलो;
माझ्यातलं अन् सूर्यातलं अंतर;
तेवढंच म्हणून चकितच झालो.
ज्या सूर्याने मला कधीच नाही;
त्याच्या प्रकाशाची सहानुभुती दाखवली;
जिच्या आशेवर जगताना;
माझ्या डोळ्यात कल्पना होती आकाशाची.
खरतर मी सूर्याला कधी माझ्यात;
प्रवाहीत असल्याच अनुभवलंच नाही;
पुस्तकात कधीकाळी वाचलेलं;
सत्यात कधी अवतरलंच नाही.
अजूनही माझा प्रवास सुरूच आहे;
त्या अंधारापासून ते या अंधारात;
अन् माझा सगळा जन्म जातोय;
त्या भास्कराशी नात ओळखण्यात.
सगळ्या वेळा निघून
मी असा काळाच्या वळणावर उभा;
एका नव्या सुरुवातीचा विचार करत;
जिथे आशेचा प्रकाशच संपून जातो.