व्यर्थ

रे नको हासुस मित्रा भाबड्या कवितेस या
कि मीही जाणतो दुख्ख जे तव अंतरी
वृत्त नाही छंद नाही ,नाही जरी अन गेयता
भंगल्या काही मनांची ही वेदना आहे खरी !!

*************************

वाहवा करीत मद्यपेले रिचवणारे खूप होते .
अन भग्नस्वप्नांचीही नक्षी मांडणारे खूप होते .

ती अशी सोडुन गेली की जणू नव्हतीच कधी
"खोटेच सारे प्रेम " ऐसे बोलणारे खूप होते .

वाटले मी एकटा , नाही कुणीही सोबती
हसरा मुखवटा घालुनी चालणारे खूप होते ,

मांडला संसार जेव्हा मी व्यथांचा ह्या इथे
"ही मुक्तके, नाही गजल "हे सांगणारे खूप होते .

रे प्रसादा व्यर्थ ही भाबडी कविता तुझी
हरवून गेल्या गालिबांचे ऐसे तराणे खूप होते .