दारोळ्या - एक क्वार्टर कमी पडते!!

फक्त ऐक क्वार्टर कमी पडते

 दारू हि काय गोष्ट आहे मला अजून कळलीच नाही
 कारण प्रत्येक पीणारा म्हणतो मला काही चढलीच नाही
सर्व सुरळीत सुरू असताना लास्ट पेग नंतरच गाडी अडते
 पण दर पार्टीच्या शेवटी फक्त ऐक क्वार्टर कमी पडते!

पीण्याचा प्रोग्राम म्हणजे जणू वीचारवंतची गोलमेज परीषदच भरते
रात्री दीलेला शब्द सकाळच्या आत विसरायचाच याची प्रत्येकाला खात्री असते
मी इतकीच घेणार असा प्रत्येकाचा ठरलेला कोटा  असतो
पेग बनवनारा त्यदिवशी जग बनवनाऱ्यापेक्षा मोठा असतो
स्वताच्या स्वार्थासाठी दुसर्याला प्यायच्या आग्रहाचे निमित्त असते
दर पार्टीच्या शेवटी फक्त ऐक क्वार्टर कमी पडते

पीण्याचा कार्यक्रम म्हणजे पीणाऱ्याला दरवेळेस नवीन पर्व असते
लोकांचे अकँडेमीक्सपेक्षा स्वतः च्या पीण्याचा पद्धतीवरच  डिस्कशन जास्त असते
आपण नेहमी हीच घेतो, त्याला हीच लागते असे म्हणत ऐकमेकाचे ब्रँडप्रेम जागवायचे असते
वेळ आली आणि पैसा नसला की देशीवरही तहान भागवायची असते
कारण दारू ही दारू असते आणि शेवटी कोणतीही चढते, पण दर पार्टीच्या शेवटी फक्त ऐक क्वार्टर कमी पडते

पीणाऱ्यामध्ये प्रेम ही चर्चेची सुरुवात असते,
देवदासचे खरे प्रेम पारो की दारू, यामध्ये अक्खी मैफिल कंफ्युज असते.
प्रत्येक पेग मागे तीची आठवण दडली असते
हा बाटलीत बुडला असतो ती चांगल्या घरी पडलेली असते
मग तीच्या आठवणीत थर्टीची लेवल लगेच सिक्स्टीला भीडते
म्हणूनच  दर पार्टीच्या शेवटी ऐक क्वार्टर कमी पडते

चुकून कधीतरी गंभीर वीषयावरही चर्चा चालतात
सर्वेजण मग त्यावर P.HD. केल्यासारखे बोलतात
प्रत्येकाला वाटते की त्यालाच यामधले जास्त कळते
ग्लोबल वार्मिंगची चर्चा शेवटी पोटनीवडणुकीकडे वळते
जसा मुद्दा बदलतो तशी आवाजाची लेवल पण बदलते 
 पण दर पार्टीच्या शेवटी फक्त ऐक क्वार्टर कमी पडते

फेकणे, मोठेपणा दाखवणे याबाबतीत यांच्यासारखा कोणाचा  हात नाही
ऐरवी वडा-पाव खाणारा, पण प्यायल्यावर थाई,
पास्ता आणि पीझ्झाशीवाय बात नाही
पैशे काय? ते फक्त  खर्च करासाठीच असतात
रात्री  पेगजवळ चुकलेली गणिते सकाळी चहाच्या टपरीवर सुटतात
रात्री थोडी जास्तच झाली होती हे मग त्याला तिथे कळते
दर पार्टीच्या शेवटी  फक्त ऐक क्वार्टर कमी पडते

यांच्यामते मद्य पिणे हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे
बीयर पीण्यामागे सायन्स तर देशी पीण्यामागे आर्ट आहे
पिण्यामुळे  धीर येतो, ताकत येते  यात वेगळीच झिंग असते
आयुष्याभराचा मावळा माणुस  पण त्या क्षणी त्याची  महाराजाची पत असते!
 
 म्हणूनच दर पार्टीच्या शेवटी  फक्त ऐक क्वार्टर कमी पडते, ऐक क्वार्टर कमी पडते!!